-->

31 May 2011

माझ्या काही विरह कविता



निसटते क्षण ...

मी चालत जाते दूरवर
परत पाऊले त्याच दिशेने वळून येतात ...
विसरून जाण्यासाठी खूप काही
पण आठवणी दरवेळी दगा देतात ...

वाळूसारखे निसटते क्षण हे
मी हातात धरू पाहते ...
सावरून हि स्वत:ला अखेर
पुन्हा तीच गत का होते ...

नकोय ज्यांना मी त्यांच्या
अजूनच जवळ जाते ...
समजावून हि स्वत:ला
पुन्हा पुन्हा अपमानित होते ...

क्षणभर विस्फोट भावनांचा
स्वत:वरच रुसते मी, रागावते ...
आरशात पाहिल्यावर स्वत:ला
मलाच मी अनोळखी भासते ...

शांत समुद्रकिनारी आजकाल
मन हे वेडे बैचेन असते ...
कुठल्याश्या विचारात गुंग
माझ्यातच मुळी मी नसते ...

नसतो कोणाला दुखवायचा हेतू
तरी नकळत सर्वच दुखावतात ...
रागाच्या भरात मग अजाणतेपणी
माझीच माणसे दुरावतात ...

- संतोषी साळस्कर.

4 comments:

  1. नसतो कोणाला दुखवायचा हेतू
    तरी नकळत सर्वच दुखावतात ...
    रागाच्या भरात मग अजाणतेपणी
    माझीच माणसे दुरावतात ...

    हे असंच माझं पण होतं.
    खूपच भावली कविता........(संग्रहात राहील हि आजपासून माझ्या)

    ReplyDelete
  2. kavita wachatana khupach bhavanavash jhalo... chan

    ReplyDelete
  3. खूप छान प्रकारे भावनिक शब्द गुंफून विरहाची ही माळ तयार केली आहे.
    अप्रतिम.

    ReplyDelete